केआयटीत चांद्रयान महोत्सवातून इस्रोच्या तंत्रज्ञ,शास्त्रज्ञांना कृतीशील मानवंदना
प्रश्नमंजुषा व पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेतून मधून विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
कोल्हापूर/प्रतिनिधी : केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या वतीने आज सोमवार दि.४ सप्टेंबर २०२३ रोजी चांद्रयान-३ च्या यशस्वीतेबद्दल सर्व संबंधित तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ,अभियंतांप्रती कृतीशील कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा (क्वीज) व पोस्टर प्रेसेंटेशन या दोन अभिनव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.अंतराळ या विषयाला घेऊन झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये एकूण ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये संपन्न झाली.
पोस्टर प्रेसेंटेशन या स्पर्धांमध्ये भारतीय अंतराळ शास्त्र व तंत्रज्ञान,भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ व त्यांचे योगदान,इस्रो एक प्रेरणादायी प्रवास अशा विषयाला घेऊन विद्यार्थ्यांनी पोस्टर च्या माध्यमातून सादरीकरण केले. अत्यंत सृजनशील प्रकारे विद्यार्थ्यांनी टू डी,थ्रीडी पोस्टर बनवले व अनोख्या पद्धतीने भारतीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ,अभियंते यांप्रती अभिमान व्यक्त केला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी श्री. परीक्षक म्हणून उपस्थित होते. पोस्टर प्रेसेंटेशन साठी प्रा.युगेन कुलकर्णी,सांगली व श्री. ऋग्वेद बिनुर यांनी परीक्षक म्हणून सहकार्य केले. केआयटी मधील मॅट्रिक्स व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेतील विजेत्यांना सन्माननीय अतिथी व परीक्षका परीक्षकांच्या हस्ते रोख पारितोषिक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.केआयटी चे विद्यार्थी उपक्रमाचे डीन डॉ.जितेंद्र भाट यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.“अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाला प्रोत्साहन मिळते तसेच स्वतःचे विचार मांडण्याला संधी मिळते ” अशा प्रकारचे मनोगत डॉ.भाट यांनी व्यक्त केले.मॅट्रिक्स उपक्रमाचे समन्वयक प्रा.शितल वरूर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमित वैद्य यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅट्रिक्स व्यासपीठाच्या ध्रुव नाखवा याने तर प्रास्ताविक श्वेता बंकापुरे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयोच्या कार्तिक यादव यांनी केले.जतीन सावंत, साधना खरात,शुभम धवन,अभय आयरे ,माधव धामापूरकर,हर्ष माळी,प्रांजली महात्मे,ऐश्वर्या पाटील व इतर अन्य स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक राष्ट्रगीताने झाली.