आक्रमक आंदोलक शेतकरी कामगार नेते संजय पाटील भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेली वीस वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या अभिनव आणि आक्रमक आंदोलनाने सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे शेतकऱ्यांचे वंचितांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई करून त्यांना न्याय देणारे आंदोलक या नावाने प्रसिद्ध असणारे संजय पाटील तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी संजय पाटील यांच्याबरोबर त्यांचे महत्त्वाचे पदाधिकारी विविध संघटनांमध्ये काम करणारे प्रवेश करणार आहेत. त्यांच्या निवासस्थानी कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी शेतकरी नेते किसान सेल भारत राष्ट्र समिती प्रदेशाध्यक्ष श्री माणिक दादा कदम व कोल्हापूर जिल्हा समन्वयक तोहीद बक्षु व त्यांचे प्रमुख सहकारी उपस्थित राहणार आहेत.प्रस्थापित नेते व प्रस्थापित पक्ष यांच्या विरोधात लढण्यासाठी संजय पाटील भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत अनेक मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव आहे जनस्वराज शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी दहा वर्षे काम केले त्यावेळी त्यांचा जिल्ह्यातील बारा तालुके यांच्याशी व्यक्तिगत संबंध आला असून प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना मानणारा वर्ग व कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे गेल्या वीस वर्षात त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली ५०० हून अधिक आंदोलने केलेले आहेत फक्त आंदोलने केली नाहीत तर आंदोलनातून सातत्याने पाठपुरावा करून विषयांची सोडवणूक करून कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय दिला आहे भविष्यामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका लागणार असून त्या दृष्टीने त्यांचा व्यापक जनसंपर्क व केलेले काम लक्षात घेऊन भारत राष्ट्र समिती त्यांना निश्चितच त्यांचा योग्य तो सन्मान करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे संजय पाटील यांच्यासोबत त्यांच्या पाच संघटना त्यांचे प्रमुख मोजके पदाधिकारी सुरुवातीला पक्षप्रवेश करणार आहेत त्यानंतर भविष्यात शहर आणि प्रत्येक तालुक्यात त्यांना मानणारे कार्यकर्ते मित्रपरिवार भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहे अन्यायाविरुद्ध टोकाचा संघर्ष करणारे व भ्रष्टाचार काळाबाजार यांचा कर्दनकाळ नेते म्हणून त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात उल्लेख केला जातो त्यांच्या भारतराष्ट्र समितीमध्ये प्रवेशामुळे भारत राष्ट्र समिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात निश्चितपणे बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या कार्याला साजेशी जबाबदारी त्यांना निश्चित मिळेल असा संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बोलताना विश्वास व्यक्त केला.