केआयटीच्या १४ विद्यार्थ्यांची टाटा पॉवर-मुंबई या कंपनीमध्ये निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (स्वायत्त) इलेक्ट्रिकल ( विद्युत) विभागातील १४ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रमानांकित टाटा पॉवर-मुंबई या कंपनीमध्ये निवड झालेली आहे. देशातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतून साहिल माळी, वेदिका जाधव, आदित्य पाटील, सायली सावंत, श्वेता सावंत, ऋतुजा माने, वेदांत सावंत, सतीश गोरखोडे, अथर्व सरनाईक, वैष्णवी रीतापुरे, गणेश कस्तुरे, प्रथमेश पवार, प्रज्ञा लटके आणि आदित्य जाधव या चौदा विद्यार्थ्यांची निवड टाटा पॉवर कंपनीने केलेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असून या काळामध्ये त्यांना रु. ७ लाखाचे पॅकेज कंपनीने घोषित केलेले आहे.
महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ.अमित सरकार, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ.विलास बुगड़े, ट्रेनिंग प्लेसमेंटचे विभाग समन्वयक प्रा. संतोष मडिवाळ यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री.सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री.साजिद हुदली, सचिव श्री.दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ.व्ही.व्ही. कार्जींन्नी आणि संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.