उद्या ६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
कोल्हापूर, दि.४ (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक ६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे विचार व कार्य सर्वांपर्यंत पोहोचवूया. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, तरुण मंडळे, बचत गटांच्या सदस्यांसह सर्व घटकांनी सहभागी व्हावे व इतरांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करुया.. असेही आवाहन त्यांनी केले आहे.