शिव – शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी पक्षविरहित शेतकऱ्यांच्या हितासाठी ;व्यक्तिगत मत मांडाव लागण हि संजय पवारांची राजकीय नाचक्की : शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव
कोल्हापूर/प्रतिनिधी : वैयक्तिक स्वार्थासाठी प्रत्त्येक निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाणाशी गद्दारी करणाऱ्या संजय पवारांना कोणीही किंमत देत नाही आहे. शिव – शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची स्थापना पक्षविरहीत आणि शेतकरी हिताच्या कामासाठी झाली आहे. पण, अक्कल शून्य संजय पवार यांना काल दिवसभरात या पक्षविरहित आघाडीला विरोध करण्याची अक्कल सुचली नाही. परंतु, आज नेहमीप्रमाणे दुधात मिठाचा खडा याप्रमाणे संजय पवार यांना “व्यक्तिगत” मत पत्रकाद्वारे मांडाव लागल, ही संजय पवार यांची राजकीय नाचक्की असल्याची जोरदार टीका शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, खरी शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यामुळे संजय पवार हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नाहीत. त्यामुळे शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून त्यांना कोणत्या गोष्टी मान्य असाव्यात नसाव्यात याचा काडीमात्र फरक शिव – शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीवर पडणार नाही. या आघाडीमध्ये सामील सर्वच नेते पक्षविरहीत आणि शेतकरी हिताच्या कामासाठी आणि कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीसाठी एकत्र आले आहेत.
वास्तविक पाहता, संजय पवार यांच्या तोंडी गद्दारी हा शब्द शोभत नाही. विधानसभेच्या प्रत्त्येक निवडणुकीत संजय पवार यांनी शिवसेना उमेदवार आणि धनुष्यबाणाविरोधात काम केले आहे. त्यावेळी त्यांना सन्माननीय उद्धवजी दिसले नाहीत का? त्यांनी शिवसेना उमेदवारांच्या विरोधात केलेले काम “मातोश्री” शी गद्दारी नाही का? धनुष्यबाणा विरोधात प्रचार करून संजय पवार यांनी सन्माननीय उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. त्यामुळे मुळचे गद्दार असलेल्या संजय पवार यांनी दुसऱ्यावर शिंतोडे उडविण्यापूर्वी स्वत:चे चारित्र्य तपासावे.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने केलेल्या आघाडीमध्ये संजय पवारांना विचारात घेतले गेले नाही यावरून त्यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातली किंमत दिसून येते. त्यामुळे संजय पवार यांनी दुसऱ्याना राजकारणातून नामोहरण करण्यापेक्षा स्वत:चे अस्तित्व टिकवण्याची खबरदारी घ्यावी, असा खोचक सल्लाही श्री.रणजीत जाधव यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.