Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याकोल्हापुरात जीतोच्या वतीने अहिंसा रॅलीद्वारे जनजागृती  

कोल्हापुरात जीतोच्या वतीने अहिंसा रॅलीद्वारे जनजागृती  

कोल्हापुरात जीतोच्या वतीने अहिंसा रॅलीद्वारे जनजागृती  

कोल्हापूर/प्रतिनिधी :   शहरात जीतोच्या वतीने आज अहिंसा रॅली काढण्यात आली. शहराच्या विविध भागातून निघालेल्या या रॅलीला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने जगभरात भगवान महावीरांची बहुमोल उपदेश अहिंसा आणि शांततेचा प्रसार होण्यासाठी २  एप्रिलला रोजी अहिंसा  रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला जावा, ही रॅली यशस्वी  करण्यासाठी अहिंसा रन जनजागृती मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते.   सकाळी ९.३० वाजता  प्रतिभानगर महावीर भवन येथून रैली निघाली.  रॅली प्रतिभानगर, भक्तिपूजा नगर, पुण्य पवित्र्य सोसायटी, बिंदू चौक, शिवाजी चौक येथे आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून गुजरी बाजार, शुक्रवार पेठ, मठ बस्ती  दसरा चौक, दिगंबर जैन बोर्डिंग या मार्गाने जाऊन  शाहूपुरी मंदिर येथे या रॅलीची सांगता झाली. या जनजागृती रॅलीमध्ये सर्व पंथातील जैन बंधू-भगिनींनी भाग घेतला होता. रॅलीमध्ये  रोमचे कन्व्हेनर  जितेंद्र राठोड, चेअरमन गिरीश शहा, चीफ सेक्रेटरी अनिल पाटील, ट्रेझरर  रमणलाल संघवी, राजीव पारीख, हर्षद दलाल, अतुल शहा, लेडीज विंग चेअरमन श्रेया गांधी, सेक्रेटरी माया राठोड, आरती संघवी, वैशाली संघवी यांच्यासह जैन सोशल ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments