वसंतराव मुळीक नावाचा झंजावात
संपुर्ण जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे असणारा व सर्वसामान्यांतील असामान्य नेता म्हणजे वसंतराव मुळीक (नाना)
कोल्हापूर/अवधुत पाटील
(जिल्हा अध्यक्ष युवक मराठा महासंघ कोल्हापूर.)
गेली ३० वर्षे समाजाच्या उन्नती साठी मराठा आरक्षण असो, विध्यार्थ्यांचेप्रश्न असो, कार्यकर्ते किंवा नागरिकांचे शासन दरबारी असणारे प्रश्न असो नेहमी रस्तावर राहून काम करणारे व मराठा समाजचे संघटन हे एक वटवृक्षासारखे करनारे कोणतेही आमिश न दाखवता कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करणारे सकल मराठा समाजाचे नेते, सारथी चे संकल्पक व मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक (नाना) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
वसंतराव मुळीक यांना संपूर्ण जिल्ह्यात नाना या टोपण नावाने ओळखले जाते. शिव,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणजे नाना होय.
मराठा समाजातील जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत असणाऱ्या अनेक अनिष्ट चाली रूढींना फाटा देऊन समाजासाठी एक आदर्श अशी आचारसंहिता तयार करण्याचे काम सुद्धा नांनानी केले. यामध्ये प्रामुख्याने माणुस मेल्यानंतर एक मूठ रक्षा नदीमध्ये व बाकीची कुंडामध्ये किंवा शेता मध्ये, अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून नैवेद्य ठेवते वेळी फक्त घरच्याच लोकांनी एक नैवेद्य ठेवावा, बारा दिवसाचा कालावधी कमी करणे, बारा दिवसाला भांडी न वाटणे अश्या अनेक चाली रूढींना फाटा देण्याचे काम त्यांनी केले व समाजासाठी एक आदर्श अशी आचारसंहिता बनवण्याचे काम केले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत असताना समाजातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने कोल्हापूरातील मराठा क्रांती मोर्चात पहिल्यांदाच सारथी म्हणजे राजर्षी शाहू महाराज मानव विकास व संशोधन केंद्र या संस्थेची मागणी करून ती अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले. आज या सारथी च्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिकत आहेत तर अनेक जण अधिकारी झाले.
राजर्षी शाहू महाराज यांचे जन्म स्थळ असो वा त्यांच्या आदेशा प्रमाणे नर्सरी बागेतील त्यांचे समाधी स्थळ असो कोणाचीही पर्वा नकरता वेळो वेळी आंदोलन करून कसबा बावडा येथे असणारे जन्म स्थळ व समाधी स्थळ पूर्ण करून घेतले.सच्चा शाहू भक्त कसा असावा हे फक्त त्यांचा कडूनच शिकले पाहिजे मध्यनंतरी कोणी वेळाने आल्यावर उशिर केल्यावर हा बघ आला शाहू महाराज असे बोलले जायचे परंतु नानांनी असे म्हणणाऱ्यांच्या चपराक देऊन राजर्षी शाहू महाराज यांनी फक्त आणि फक्त लोक कल्याणाची कामे कशी केली ते वेळेवर कसे काम करत होते. याची माहिती देऊन अनेकांचे कान उघडणी केली.
त्यांनी समाजा समाजात एकोपा राहावा म्हणून शाहूंच्या विचाराने काम करणाऱ्या कोल्हापुरातील जवळपास ८५ समाजाना एकत्र आणून राजर्षी शाहू सलोखा मचंची स्थापना केली आहे.कोणताही बडे जाव नकरता एक सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा आज त्यांचे नाव संपुर्ण महाराष्ट्रभर समाजचा प्रमुख नेता म्हणून घेतले जाते. एक जिल्हा अध्यक्ष ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी पैसे कमवले नाहीत पण संपूर्ण जिल्ह्यात आपल्या विचारांचे व जीवाला जीव देणारे कार्यकर्ते तयार केले. आज मराठा महासंघाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात, गाव गावात त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा गट तयार झाला आहे. नाना तुम्ही फक्त आम्हला आदेश द्या मग बघा असे म्हणानारे कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. लिहण्या साठी बरच काही आहे. परंतु या मोजक्याच शब्दात या अमाच्या नेत्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा,
वसंतराव मुळीक आगे बढो, हम तुम्हारे साथ है
नाना आपण तयार केलेला एक कार्यकर्ता.- (शब्दांकन) अवधूत पाटील