नवरात्रोत्सवात आज शुक्रवार दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी घेतले करवीरनिवासिनी श्री. अंबाबाई देवीचे दर्शन
दुष्ट प्रवृत्ती, अन्याय व अत्याचार यांचा नाश करून सत्याचाच विजय कर…..! असे घातले साकडे
कोल्हापूर/प्रतिनिधी : नवरात्रोत्सवाच्या आजच्या दसऱ्याच्या दिवशी शुक्रवार दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी करवीरनिवासिनी श्री. अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दुष्ट प्रवृत्ती, अन्याय व अत्याचार यांचा नाश करून सत्याचाच विजय कर…..! असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देवीस साकडे घातले.यावेळी त्यांच्यासमवेत केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी महापौर आर. के. पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, माजी नगरसेवक विनायक फाळके, अरुण पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.