आरक्षणसाठी आता पुन्हा एल्गार
कोल्हापूर/(संतोष जोगळेकर) :
मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार असून येत्या १६ जून पासून कोल्हापूर मधून शाहू महाराज जन्मस्थळ पासून आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे अशी घोषणा आज खा.छत्रपती संभाजीराजे यांनी थेट रायगडावरून केली आहे. केली त्यांनी राज्य सरकारला छत्रपती संभाजीराजे यांनी सहा जून चा अल्टिमेटम दिला होता त्यामुळे सरकारने आरक्षणाबाबत आज सहा जून रोजी आंदोलन पुन्हा कोल्हापूरमधून करण्याची घोषणा केली त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी आज रायगडावर आरक्षणाबाबत येत्या १६ जून पासून आंदोलन हाती घेतले जाणार आहे असा इशारा दिला असून हे आंदोलन संपूर्ण देशभर पुन्हा एकदा गाजणार आहे कोल्हापूर मधून याआधीही मूक मोर्चा काढून मराठा आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन हाती घेतले होते यानंतर दसरा चौक येथे ही आंदोलन बेमुदत केले गेले होते त्यानंतर हे आंदोलन सर्वोच्च न्यायालयात निर्णय गेला होता त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण दिले गेले नाही काही प्रमाणात दिले होते मात्र निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये ढकलण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण रद्द केले
त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाज पेटून उठला असून या समाजाने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे सध्या कोरोनाचा कालावधी आहे अशा मध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी करून उपयोग नसल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विविध नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना ही आरक्षणाबाबत मागणी केली व त्यांच्याकडून सकारात्मक माहिती मिळवली राज्य सरकारही याबाबत सकारात्मक भूमिका घेणार होते आणि त्यांना सहा जून चा शेवटचा अल्टीमेटम छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता मात्र राज्य सरकारने याचाही गांभीर्याने विचार केला नाही आणि आज सहा जून रोजी याबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही त्यामुळे खासदार छत्रपती संभाजीराजे यांना रायगडावरून पुन्हा एकदा १६ तारखेपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार आहे अशी घोषणा केली असून आता पुन्हा एकदा आरक्षणासाठी मराठा समाज पेटून उठणार आहे आणि एकदा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजणार आहे याआधीही दसरा चौक येथे मोठा एल्गार मोर्चा मूक मोर्चा काढून सरकारला सर्वोच्च न्यायालयाने इशारा देण्यात आला होता संपूर्ण महाराष्ट्र आणि देशांमध्ये या मूक मोर्चा चे म्हणून बऱ्याच ठिकाणी मोर्चा काढून या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता थांबलेले चालणार नाही पुन्हा एकदा आंदोलन पुकारावे लागणार आहे अशी वेळ आली असून संभाजीराजे यांनी विविध नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या कानावर या गोष्टी घातल्या मात्र त्याचाही काही उपयोग झाला नसून आता येणाऱ्या १६ जून पासून शाहू महाराज जन्मस्थळ पासून कोल्हापूर येथून या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे आणि संपूर्ण देशभरात आंदोलनाला सुरुवात होईल अशी शक्यता आहे त्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर ती येईल की काय तोपर्यंत सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दहा दिवसाचा कालावधी हा राज्य सरकारला व केंद्र सरकारला देण्यात आला असून आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा साठी सरकार कोणती पावले उचलणार हे अजून तरी गुलदस्त्यात आहे याबाबत राज्य सरकारला लवकरच निर्णय जाहीर करावा लागणार आहे अन्यथा कोरोनाच्या या कालावधीमध्ये पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारले तर मात्र कोरोना महामारी मध्ये सर्वांना आवरणे राज्य सरकारला केंद्र सरकारला मुश्किल होऊन जाईल त्यामुळे पुन्हा एकदा सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे असेच म्हणावे लागणार आहे.