Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्या७५० विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत केआयटी पायोनियर २०२१ चे दिमाखदार उद्घाटन - विश्वास...

७५० विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत केआयटी पायोनियर २०२१ चे दिमाखदार उद्घाटन – विश्वास आणि पारदर्शकता हा आदर्श नेतृत्वाचा पाया – संजय कोठा

७५० विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत केआयटी पायोनियर २०२१ चे दिमाखदार उद्घाटन – विश्वास आणि पारदर्शकता हा आदर्श नेतृत्वाचा पाया – संजय कोठा

कोल्हापूर/प्रतिनिधी : विश्वास आणि पारदर्शकता हा आदर्श नेतृत्वाचा पाया आहे. त्यामुळे या गुणांखेरीज तुम्ही भक्कम भवितव्य नियोजित करु शकत नाही असे मत अदानी ग्रुपचे श्री. संजय कोठा यांनी व्यक्त केले. केआयटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये पायोनियर २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला सन्मानीय उपस्थिती डॉ. रणजीत सावंत, इन्चार्ज चेअरमन, आयएसटीई, महाराष्ट्र गोवा विभाग तर अध्यक्षस्थानी केआयटीचे चेअरमन श्री. भरत पाटील होते.
श्री. संजय कोठा यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या उद्योग क्षेत्रातील अनुभवाचे दाखले देत आदर्श नेतृत्वाची वैशिष्टये सांगितली आणि उपस्थित विद्यार्थ्यांना भारताचे विविध क्षेत्रातील भावी नेतृत्व बनण्याचे आवाहन केले. यामध्ये त्यांनी समस्या उकल कौशल्य, संवाद कौशल्य, दूरदृष्टीकोन, स्वयंशिस्त आणि मानवता या मुल्यांना अधोरेखित केले. याचबरोबर त्यांनी कौशल्य आणि तंत्रज्ञान यांची सांगड असणारी शिक्षण प्रणाली भारताची भावी पिढी घडण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले.
त्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी पादाक्रांत केलेल्या यश शिखरांची माहिती सांगून अनेक कंपन्या भविष्यात सर्जनशील, कौशल्यपूर्ण विद्याथ्र्यांचे नेहमी स्वागतच करतील असे सांगितले. त्यांच्या ४० मिनिटांच्या प्रश्नोत्तर सत्राने विद्यार्थ्यांना अमोघ प्रेरणा आणि उर्जा मिळाली. यावेळी प्रमुख उपस्थित असलेले डॉ. रणजीत सावंत, इन्चार्ज चेअरमन, आयएसटीई, महाराष्ट्र गोवा विभाग यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राचा सद्य परिस्थितीतील लेखाजोखा मांडून काळानुरुप बदलून स्वत: कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून श्री. भरत पाटील यांनी केआयटीच्या आगामी उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन केआयटीला जास्तीत जास्त विद्यार्थीभिमुख बनविण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले व वेगवेगळया स्पर्धेतील सहभाग हीच यशाची चावी आहे असे सांगून सहभागी विद्याथ्र्यांचे मनोबल वाढविले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केआयटीचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी यांनी केले. व केआयटीची १९८३ पासूनची वाटचाल सहभागी स्पर्धक व पाहुणे यांच्यासमोर मांडली. यावेळी केआयटीचे सचिव श्री. दिपक चौगुले व विश्वस्त श्री. सचिन मेनन उपस्थित होते.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ग्रंतेज ओतारी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. अक्षय थोरवत, सहअधिष्ठाता प्रा. रंजिता पांढरे, आयएसटीईचे समन्वय प्रा. अभिजीत पाटील यांनी ही स्पर्धा नियोजन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. प्रा. क्षितिजा ताशी यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. आयएसटीई स्टुडंट चॅप्टर विद्यार्थी प्रमुख दिविजा भिवटे हिने आभार मानले तर अरुंधती पाटील, मोहसीन मुलानी व वेदिका हर्डिकर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments