केर्ली येथील वृक्षमित्र पंडित माने यांनी गुजरातमधील गिरणार पर्वतावर केली २ लाख वृक्षांची लागवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर ते गिरनार पर्वत यात्रेत वृक्षमित्र पंडित माने यांनी गुजरात मधील वेगवेगळ्या ठिकाणी दोन लाख वृक्ष लागवड केली आहे. कोल्हापूरच्या वृक्ष मित्राने गुजरात मध्ये केलेल्या वृक्ष लागवडी ने येथील लोक भारावून गेले आहेत. कोल्हापुरच्या नागरिकांचे त्यांनी कौतुक केले या कामात माने यांना दयानंद बाबां च्या भक्त गणांचे सहकार्य मिळाले.
स्वामी दयानंद महाराज,बाळ महाराज यांच्या संकल्पनेतून दिनांक २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर ते गुजरात गिरणार पर्वत यात्रेचे आयोजन केले होते.केरली येथील संत बाळूमामा वृक्षारोपण संकल्पाचे पंडित माने यांनी यात्रेत सहभाग घेतला होता. २०१७ मध्ये त्यांनी गुजरात मध्ये दहा हजार वृक्ष लागवड केली होती. याचवेळी दोन लाखांचा संकल्प माने यांनी केला होता.पंडित माने, सुनिता माने,नवनाथ माने,अंजली माने या कुटुंबीयांचे व त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. गुजरातमधील गाईंना चांगल्याप्रकारे चारा उपलब्ध व्हावा यासाठी कोणत्या प्रकारची जलदगतीने वाढणारी झाडे कशी व कोठे लावायची याची माहिती माने यांनी या मोहिमेत दिली. २०१७ मध्ये लावलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटून त्याच्या कांड्या करून नवीन झाडे लावण्यात आली. दयानंद बाबाचे भक्तगण झाडे लावण्यासाठी जागा दाखवण्यासाठी प्रयत्न करत होते. कृष्णा तुळस, श्वेता तुळस, रानतुळस, कंपूरातुळस, विलाईन चिंच,आंबट चिंच, आवळा, पेरू आदींची झाडे या पर्वतावर लावण्यात आली.