केंद्राचे कृषी कायदे हे अंतिम शेतकऱ्याच्या फायद्याचेच आहेत,पण काहीजणाकडून जाणीवपूर्व गैरसमज – भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा आरोप
कोल्हापूर/ प्रतिनिधी : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे अंतिम शेतकऱ्याच्या फायद्याचेच आहेत,मात्र आपले हितसंबंध दुखावलेले अनेकांकडून त्याविषयी गैरसमज निर्माण केले जात आहेत, शेतकरी वर्गाची चर्चा करून यामध्ये सुधारणे सह ते अधिकाधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे अशी माहिती त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. गेली चार महिने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाडगे हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या कायद्यासंदर्भात प्रबोधन करण्याससह त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहोत घेत आहेत, त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही प्रतिक्रिया अर्थहीन आहे , असा टोलाही त्यांनी पालकमंत्री सतीश पाटील यांनी लावला.
मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीमधील न्यायालयीन प्रक्रियेच्या वेळी राज्याचे संबंधित मंत्री आणि वकील हे वेळेत हजर राहून त्यांनी कंपनी आपली बाजू मांडावी आणि सकारात्मक निर्णय घेऊनच यावे ,अशी अपेक्षाही दादा पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे राजकारण या देशाच्या तुलनेत नेहमीच आदर्श वर आणि परस्पर समन्वय राहिलेली आहे त्यामुळेच महादेव जानकर यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेणे यात काही गैर नाही उलट परस्पर समन्वयातूनच अनेक मक्याच्या संवादातूनच समाजातील विविध समस्या सुटण्यासाठी अग्रक्रमाने मदतच होईल असा दावाही शेवटी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केला.यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे ऊपस्थित होते.