कोल्हापुर मिलेट महोत्सवामध्ये सतरा लाखांची उलाढाल
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही टी पाटील स्मृतिभवन,राजारामपुरी येथे आयोजित केलेल्या मिलेट महोत्सवाची आज सांगता झाली. महोत्सवाच्या सांगता समारंभस श्री बसवराज बिराजदार कृषी सहसंचालक, कोल्हापुर उपस्थित होते. सदरच्या चार दिवसीय मिलेट महोत्सवामध्ये एकूण सतरा लाखांची रुपये उलाढाल झाली. त्यामध्ये नाचणीची बिस्किट, चिवडा, नाचणीचे पीठ, सोलापुरी ज्वारीच्या भाकरी, असे तृणधान्याचे विविध प्रकार या महोत्सवांमध्ये कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या स्टॉल धारकांचा सत्कार कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच यावेळी सांगवडे येथील शासनाचा शेती निष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री महादेव टेळे यांचा सत्कार करण्यात आला, महोत्सवाच्या समारोप वेळी बोलताना श्री बिराजदार यांनी नवीन पिढी ने तृणधान्याचे महत्त्व विचारात घेऊन आपल्या आहारामध्ये तृणधान्याचा वापर वाढवला पाहिजे असे सांगितले. कृषी पणन मंडळांनी शेतकऱ्यांना एक चांगली व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि त्याचा फायदा होत असल्याचे नमूद केले. उपस्थित स्टॉल धारकांनी कृषी पणन मंडळाने अतिशय चांगले नियोजन केल्या बद्दल कृषी पणन मंडळाचे आभार व्यक्त केले. चार दिवसीय मिलीट महोत्सवास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी महाराष्ट राज्य कृषि पणन मंडळांचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले,अनुप थोरात,प्रतिक गोनुगडे,प्रसाद भुजबळ,ओंकार माने, सुयोग टाकले, सत्यजीत भोसले, अनिल जाधव, किरण जाधव,पुजा धोत्रे,संदेश पिसे,रविंद्र शेलार आदी उपस्थित होते.