Friday, June 27, 2025
spot_img
Home Blog Page 6

डिझाईनसाठी सामाजिक जाण आवश्यक: जिल्हाधिकारी येडगे

0

डिझाईनसाठी सामाजिक जाण आवश्यक: जिल्हाधिकारी येडगे

घोडावत विद्यापीठाच्या ‘कलानुभव’ प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी : डिझाईन क्षेत्रात शिक्षण घेताना व करिअर करताना विद्यार्थ्यांना सामाजिक जाण असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल घाडगे यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाईन च्या वतीने आयोजित कलानुभव २०२५ प्रदर्शनाचे उद्घाटन शाहू स्मारक, कोल्हापूर येथे २६ एप्रिल रोजी येडगे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, की विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेली कामे केवळ कलात्मक नाहीत तर सामाजिक जाण, नावीन्यपूर्ण विचार आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोगी केल्याचे दिसून येते. यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले श्रम आणि सर्जनशीलता कौतुकास्पद आहे.
या प्रदर्शनात इंटेरियर डिझाईन, ग्राफिक डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन आणि फॅशन डिझाईन शाखेतील विद्यार्थ्यांनी केलेले प्रोजेक्ट प्रदर्शनात मांडण्यात आले.
घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. उद्धव भोसले यांनी कलानुभव प्रदर्शनासाठी कष्ट घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आणि संचालक डॉ.विवेक कुलकर्णी, समन्वयक स्वप्नाली कुलकर्णी यांचे कौतुक केले. कलानुभव हे फक्त एक प्रदर्शन नसून विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रवासाचा, मेहनतीचा आणि विचारशक्तीचा सन्मान असल्याचा उल्लेख केला.
उद्घाटन प्रसंगी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, मार्केटिंगचे अभिजीत लाटकर, डिझाईनचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. यासाठी चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्शन केले.२६ व २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या याप्रदर्शनास विद्यार्थी, पालक, शिक्षक, डिझाईन क्षेत्रातील तज्ञ व कला क्षेत्रातील कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

अल्पसंख्यांक संस्थांनी नेहरू हायस्कूल सारख्या शाळा डिजिटल कराव्यात : मा.नामदार प्यारे खान

0

अल्पसंख्यांक संस्थांनी नेहरू हायस्कूल सारख्या शाळा डिजिटल कराव्यात : मा.नामदार प्यारे खान

कोल्हापूर/प्रतिनिधी : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी,कोल्हापूर संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनि.कॉलेज,कोल्हापूर येथे नव्याने डिजिटल पॅनेलबोर्डने सुसज्ज डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मा.ना.प्यारे खान यांचे हस्ते करणेत आले.या प्रसंगी बोलताना मा.ना. प्यारे खान यांनी अल्पसंख्यांक शाळांनी आपला दर्जा वाढवावा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी मुस्लिम समाजाची उन्नती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी श्रीमती लालुबाई मकबूल ताशिलदार यांचा सत्कार मा.नामदार प्यारे खान यांचे हस्ते करणेत आला. संस्थेचे चेअरमन मा.गणी आजरेकर यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांच्या संस्कारांनी सुसंस्कृत असलेने कोणत्याही प्रकारच्या जातीय दंगली पासून मुस्लिम समाज दूर असल्याचे सांगितले.मुस्लिम बोर्डिंग ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलीम सामाज्याती विद्यार्थ्यांबरोबरच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त केले असलेबाबतप्रतिपादन केले.हायस्कूल माधील सर्व वर्गखोल्या डिजिटल केल्या जाणार असल्याबाबत माहिती दिली.संस्थेचे प्रशासक मा.कादरभाई मलबारी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेबद्दल व शाळेबद्दल माहिती दिली.शालेय समिती चेअरमन मा.रफिक शेख यांनी पाहुण्यांची ओळख करू दिली.संचालक मा.रफिक मुल्ला यांनी आभार मानले.सूत्र संचालन जिलानी सर यांनी केले.या प्रसंगी संस्थेचे संचालक हाजी जहांगीर अत्तार,फारूक पटवेगार,अल्ताफ झांजी,मलिक बागवान,हाजी लियाकत मुजावर,प्रा.सिकंदर डांगे,प्रा.डॉ.समी मुल्ला,प्रा.शौकत बोजगर,मा.राहीद खान,डॉ.इस्माईल नमाजी,मुख्याध्यापक श्री.ताशिलदार एम.विद्यार्थी,पालक,शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थी दशेतच तांत्रिक शिक्षणाचे संस्कार व्हायला हवेत – सा.पो.नि. सुनील गायकवाड

0

विद्यार्थी दशेतच तांत्रिक शिक्षणाचे संस्कार व्हायला हवेत – सा.पो.नि. सुनील गायकवाड

शिरोली /प्रतिनिधी : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅक संचलित श्रीमती सोनाबाई एस. जाधव बीटीसी आणि स्वर्गीय जवानमलजी गांधी आयटीआय च्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांकरता निशुल्क तीन दिवसीय सुट्टीतील घरगुती तांत्रिक कौशल्ये प्रशिक्षण शिबिराचे २३ ते २५ एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराची सांगता शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
स्मॅकचे चेअरमन राजू पाटील अध्यक्षस्थानी होते.
आज तांत्रिक शिक्षण घेणे, कौशल्य संपादन करणे व आधुनिक तंत्रज्ञानाची कला शिकून घेणे ही काळाची गरजच निर्माण झाली असून विद्यार्थी दशेतच अशा प्रकारचे तांत्रिक शिक्षणाचे संस्कार व्हायला हवेत असे मत पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले व स्मॅक आयटीआय ने यासाठी शिबिराच्या निमित्ताने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
राजू पाटील म्हणाले की स्मॅक च्या वतीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे शिबिर आयोजित केले गेले. दरवर्षी या शिबिराचे आयोजन केले जाईल.
शिबिरामध्ये घरगुती उपयोगी पडणारे कौशल्ये, किरकोळ स्वरूपाची नळदुरुस्ती, वीज उपकरणे उदा. पंखे, गिझर, मिक्सर आदी तसेच किरकोळ फिटिंग कामे व मोजमाप याचे प्रशिक्षण निदेशकांकडून दिले गेले.
या शिबिरास प्रशिक्षणार्थी व पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परिसरातील बहुतांशी शाळा यात सहभागी होत्या. यामध्ये प्रामुख्याने सिम्बॉलिक इंंटरनॅॅशनल स्कूल शिरोली, शिरोली हायस्कूल, टोप हायस्कूल, राष्ट्रसेवा प्रशाला हायस्कूल, शिये हायस्कूल, राधाबाई शिंदे हायस्कूल कोल्हापूर, संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल व साई इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर आदी शाळांचा सहभाग होता.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.
सिम्बॉलिक इंंटरनॅॅशनल स्कूलची विद्यार्थिनी स्नेहा मखिजा, विद्यार्थी प्रणव प्रशांत पाटील, धैर्यशील पाटील यांनी या शिबिराची उपयुक्तता सांगितली.या शिबिराचा मुुख्य हेतू तांत्रिक कौशल्यांची माहिती देणे, विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाची आस्था वाढीस लागणे व पालकांना या कौशल्यांंचा उपयोग होणं हा होता. तो हेतू साध्य झाल्याचे आयटीआय प्राचार्य प्रसन्न वरखेडकर यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमास सिम्बॉलिक इंंटरनॅॅशनल स्कूलच्या शिक्षिका कोमल बारड, शीतल मांडवकर तसेच पालक प्रतिनिधी म्हणून विमा विकास अधिकारी महेश माने व सौ कांबळे उपस्थित होत्या.या शिबिराच्या यशस्वीयते साठी स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके, सर्व ट्रेनिंग कमिटी सदस्य, निदेशक, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमास स्मॅकचे ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे, आयटीआय ट्रेनिंग कमिटी सदस्य भीमराव खाडे, निमंत्रित सदस्य अजिंक्य तळेकर व उद्योजक संदीप साळुंखे उपस्थित होते.

लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स ही यशाची त्रिसूत्री -‘मौरीटेक’चे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील यांचे प्रतिपादन

0

लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स ही यशाची त्रिसूत्री -‘मौरीटेक’चे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील यांचे प्रतिपादन

-डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘टेक्नोत्सव २०२५’ संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स या त्रिसूत्रीचा वापर करून आयुष्यात यशस्वी व्हा. फक्त आपल्या शाखेपुरत मर्यादित न राहता अनेक विषयात पारंगत व्हा, असा कानमंत्र ‘मौरीटेक ‘ हैद्राराबादचे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दिला. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ‘टेक्नोत्सव २०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राष्ट्रीय स्तरावरील या दोन दिवसीय स्पर्धेत विविध राज्यातील 1800 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
रितुराज टी. पाटील म्हणाले, हा फक्त टेक्नॉलॉजीचा इव्हेंट नाही तर कोलाब्रेट लर्निंग इव्हेंट आहे. ही खुप मोठी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, यासाठी फक्त प्रत्येकाकडे शिकण्याचा भूक हवी. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या शाखेपुरते मर्यादित न राहता, बहू शाखीय ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. प्राचार्य संतोष चेडे यांनी, सध्याचे युग हे स्पर्धेचे असून खूप मोठी आव्हानं समोर आहेत. उद्योगांमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी आहेत त्या समजावून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे नॉलेज मर्यादित ठेवू नका, त्याचा उद्योग विश्वाला फायदा करून द्या असे आवाहन त्यांनी केले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा आदी राज्यातून पंधराशेहुन अधिक स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सिव्हिल विभागाकडून सेतू बांधा रे, सी.एस.ई विभागाकडून अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट कॉम्पिटिशन, आर्किटेक्चर विभागाकडून अनसिंगकेबल डिझाईन, द फ्लोटिंग चॅलेंजेस, एआयएमएल कडून लॉन्च पॅड (शार्क टॅंक), इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रमुनिकेशन विभागाकडून रोबो सॉकर, केमिकल विभागाकडून प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, मॉडेल कॉम्पिटिशन, मेकॅनिकल विभागाकडून रोबो रेस, टेक डिबेट अशा एकूण आठ विभागाकडून विविध प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व विभागातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना मिळून एकूण अडीच लाखांची बक्षिसे प्रदान करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते जी त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यकर्ते संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डॉ. अजित पाटील, समन्वयक डॉ. प्रशांत जगताप, डॉ. कपिल कदम, अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

0

विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

-डी. वाय. पाटील विद्यानिकेतन येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

साळोखेनगर (वार्ताहर) : शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यापुरते मर्यादित नसून, व्यक्तिमत्व विकासासाठी देखील ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. मीना शेंडकर यांनी केले. डी वाय पाटील विद्यानिकेतन (सीबीएसई), साळोखेनगर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
आपल्या भाषणात सौ. शेंडकर यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन आणि गुणवत्ता आधारित शिक्षणाची महत्ता पटवून दिली.यावेळी पालक वर्गालाही त्यांनी पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.वाय पाटील नॉलेज कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने होते. प्राचार्या डॉ. शांतीकृष्णमूर्ती यांनी स्वागत आणि प्रस्ताविक करताना शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शाळा त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, नाट्य व गीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण रंगतदार केले. पालक आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलेला भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाला संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त श्री. ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!

0

येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आता घर करण्यास सज्ज आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘गुलकंद’ची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.
ट्रेलरमधून “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंबं एकत्र येतात. परंतु या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं. आता ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये काय गोंधळ उडणार? आणि ही गुंतागुंत सुटेल का? याचं उत्तर १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे. ‘गुलकंद’ हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ आहे. ढवळे-माने कुटुंबांच्या संसारात मुरलेला ‘गुलकंद’ प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल, याची खात्री आहे.
चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘चंचल’ या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळुवार स्पर्श केलाय. गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्यं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आहेत. या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे तर अविनाश – विश्वजित यांनी संगीत दिले आहे. ओठांवर सहज रुळणारं हे गाणं आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे. चित्रपटातील दुसरं गाणं ‘चल जाऊ डेटवर’ हे गाणंही सध्या ट्रेण्डिंगमध्ये आहे. गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना भावणारे आहे. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजित यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, “नातं जेव्हा एकसुरी होतं, तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं आणि हाच गोडवा ‘गुलकंद’ चित्रपटात आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल. आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले, पण या चित्रपटात भावना, नाती, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे. एव्हरेस्टचे संजय छाब्रिया या कुटुंबाचा भाग झाले, हे आमचं भाग्य. ही टीम एकमेकांना ओळखते, त्यामुळे ‘गिव्ह अँड टेक’ अप्रतिम झाला आहे. हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल.”
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “‘गुलकंद’ हे आमचं एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे. दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा चित्रपट आम्ही आणत आहोत. कलाकार, दिग्दर्शक, सगळ्यांनी कमाल काम केलं आहे. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना या गोडसर अनुभवाचा नक्कीच आनंद मिळेल.”

सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने श्री भगवान परशुराम जन्मोत्सव ,शिवजयंती यंदा साधेपणाने साजरी होणार

0

सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने श्री भगवान परशुराम जन्मोत्सव ,शिवजयंती यंदा साधेपणाने साजरी होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम ), कोल्हापूर चित्पावन संघ , कऱ्हाडे ब्राह्मण संघ तसेच सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने दरवर्षी त्रेतायुगादी दैवत भगवान श्री.परशुराम यांचा जन्मोत्सव सोहळा आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते . यावर्षीही समाजाच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती.परंतु काश्मीर पहलगाम येथे आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला . त्यामुळे सध्या संपूर्ण देश आणि देशवासीय दुःखामध्ये आणि आक्रोशात आहेत.या मृत झालेल्या आपल्या बांधवांच्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करत आहोत . तसेच केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की या हल्ल्यातील दोषींवरती त्वरित कडक कारवाई करून मृतांच्या नातेवाईकांना न्याय द्यावा.अशा प्रसंगामध्ये परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त साजरा करण्यात येणारा भव्य कार्यक्रम करणे हे उचित वाटत नाही . म्हणूनच यंदा आम्ही मंगळवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता भगवान परशुराम आणि छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा साधेपणाने करणार आहोत . नेहमी पेटाळा मैदानावरती होणारा कार्यक्रम यावर्षी बिनखांबी गणेश मंदिर येथील मंगलधाम येथे समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत साधेपणाने होणार आहे .
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा ब्राह्मण संघाबरोबरच सारस्वत विकास मंडळ , ब्राह्मण पुरोहित संघ ,परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा कमिटी, बीबीएफ पालखीमंडळ तसेच वी फॉर अवर्स युवा ग्रुप चे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यरत आहेत . अशी माहिती डॉ . उदय कुलकर्णी , श्रीकांत लिमये , मकरंद करंदीकर , प्रसाद भिडे , धर्मराज पंडित , मिलिंद पावनगडकर , विनिता आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
या उत्सवाच्या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम सकल ब्राह्मण समाजातील विविध जाती पोट जाती संस्था संघटनांच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात . अगदी समाजातील मौजी बंधन , संक्रांती कालावधीतील धुंदूरमास , चित्पावन अष्टमी जागर सोहळा अशा धार्मिक सोहळ्यांबरोबरच व्याख्याने , संगीत मैफल , पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण , महिलाविषयक कार्यशाळा , आर्थिक साक्षरतेसाठी कार्यशाळा असे उपक्रम राबवले जातात . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील बंधू-भगिनींबरोबरच विद्यार्थी गुणगौरव सोहळा दरवर्षी साजरा केला जातो .
भगवान परशुराम जन्मोत्सव , छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे ठिकाण हे ब्राह्मण सभा करवीर ( मंगलधाम ) बिन खांबी गणेश मंदिर परिसर २९ एप्रिल सायंकाळी ६ वाजता असे आहे तरी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बीसीसीआय मान्यता प्राप्त टाटा आयपीएल २०२५ (IPL २०२५ ) T २० या स्पर्धेचे विनामुल्य आज,उद्या सादरीकरण

0

बीसीसीआय मान्यता प्राप्त टाटा आयपीएल २०२५ (IPL २०२५ ) T २० या स्पर्धेचे विनामुल्य आज,उद्या सादरीकरण (प्रमोशन) ‘फॅन पार्क ’ (FAN Park) कोल्हापूरात आठव्या वर्षी आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशभर प्रसिध्द असलेली क्रिकेटची लोकप्रिय व बीसीसीआय मान्यता प्राप्त टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे विक्रमी १८ वे वर्षे आहे यावर्षी दि २२ मार्च ते २५ मे २०२५ या कालावधीत भारतात वेगवेगळया राज्यातील शहरांमध्ये घेतली जात आहे या स्पर्धेच्या सादरीकरणासाठी व त्यांचा प्रचार व प्रसार करणेसाठी बीसीसीआयने भारतात ५० शहरांची व महाराष्ट्रातील नागपुर सोलापूर कोल्हापूर व रत्नागीरी या चार शहरांची निवड केली आहे त्यापैकी आपल्या कोल्हापुर शहरांचा मागील सात वर्षीच्या प्रेक्षकांच्या अभुतपुर्व प्रतिसादा मुळे यावर्षी आठव्यांदा समावेश केला आहे आत्तापर्यत आयपीएलच्या फॅन पार्कचा भारतातील वेगवेगळया ३५ शहरातील चार लाख क्रिडा रसिकांनी सामन्याचा आनंद लुटला आहे दि २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी कोल्हापूर बरोबरच अमॄतसर भोपाळ मध्यप्रदेश रायगंज व तमकुरू या वेगवेगळया शहरात टाटा आयपीएलच्या फॅन पार्कचे एकाच वेळी थेट प्रेक्षेपण केले जाणार आहे
या अनुषगांने दि २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ३ ते रात्री १० वाजेपर्यत आयपीएल मधील सामन्याचे दि २६ एप्रिल २०२५ रोजी सायकांळी ७.३० वाजल्या पासुन व दि. २७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्या पासुन कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर सादरणीकरण केले जाईल दि २६ एप्रिल २०२५ रोजी सायकांळी ७.३० वाजता कोलकत्ता नाईट रायडर्स विरूध्द पंजाब किंग्ज, दि.२७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई इंडियन्स विरूध्द लखानौ सुपर जांईटस् व सायंकाळी ७.३० वाजता दिल्ली कॉपिटल्स विरूध्द राॅयल चॅलेजर बेंगलूरू या तीन सामन्याचे मोठया पडद्यावर ३२×१८इंच (LED Screen) थेट प्रेक्षपण केले जाणार आहे यासाठी पहिल्या दिवशी सायकांळी ५.०० वाजले पासुन व दुस­-या दिवशी दुपारी १.०० वाजले पासुन प्रवेश दिला जाईल कोल्हापुरच्या क्रिडा रसिकांना अगदी स्टेडियम सारखा थरार अनुभवता येईल या फॅन पार्क मध्ये प्रवेश सर्वाच्या साठी विना मुल्य असणार आहे या थेट प्रेक्षपणा बरोबरच फॅन पार्क मध्ये संगीत तसेच विविध स्टाॅल्स मधुन खाण्या ­ पिण्याचे पदार्थ आणि इतर वस्तु तसेच आपीएल च्या प्रायोजकांकडुन इतर अनेक गोष्टी उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे आतल्या वातावरणात आणखीनच रंगत येईल व थरारात भर पडेल या दरम्यान मोठया संखेने कोल्हापुरातील अबाल वॄध्द व महिला प्रेक्षकांना या सामन्याचा प्रत्यक्ष स्टेडियम सारखा अनुभव घेता येईल जेष्ठ नागरीकांच्या साठी स्वतत्र बैठक सुविधा असेल
या उपक्रमा साठी दोन दिवसांत १५ ते २० हजार लोक ये जा करतील असा अंदाज आहे हया उपक्रमांच्या स्थानिक प्रसिध्दीसाठी मुख्य कार्यक्रमाच्या चार दिवस अगोदर कोल्हापुर शहरा बरोबर परिसरातील उपनगरांमध्ये मोठ मोठे डिजीटल बोर्ड व दोन कॅटर गाडया उपक्रमांच्या प्रसिध्दीसाठी फिरवली जात आहेत त्याच बरोबर लकी ड्रॉ कुपनचे या गाडया मधुन वितरण करणेत येत आहे या लकी ड्राॅ मधील विजेत्यांना आकर्षक बक्षिस देणेत येतील

*कार्यक्रमाची इतर वैशिष्टे*

संपुर्ण मैदानावर हिरवे कॄत्रीम कापडी अच्छादन लावलेले असेल ° हा उपक्रम प्रेक्षकांसाठी विनामुल्य आहे ° खाद्य पदार्थाचे स्टाॅल्स ° उपस्थित प्रेक्षकांचे ओबी व्हॅन व्दारे थेट प्रेक्षपणा व्दारे प्रसिध्दी ° दरवाजा पहिल्या दिवशी सायकांळी ५ वाजता व दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता खुले ° विविध करमणुकीचे व मनोरजंनाचे गेम्स अनुभवता येतील ° व्हरच्र्युएल क्रिकेट गेम ° लकी ड्राॅ मार्फत आकर्षक टी शर्ट व आकर्षक बक्षिसे देण्यात येतील ° जेष्ठ नागरीकांच्या साठी स्वतत्र बैठक सुविधा

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २६ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन

0

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २६ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी :आर. एल. तावडे फाउंडेशनचे, सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि ‘अ‍ॅसोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया’ (APTI) महाराष्ट्र राज्य, यांच्या संयुक्त विद्यमाने इमर्जिंग ट्रेंड्स इन ड्रग डिस्कव्हरी अँड ट्रान्सलेशनल रिसर्च या विषयावर आधारित राष्ट्रीय पातळीवरील परिषद दिनांक २६ एप्रिल २०२५, रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदचे विषय नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टिम, रेग्युलेटरी अफेअर्स, आर्टीफिसिअल इंटेलिजन्स ई. आहेत. या परिषदेमध्ये विविध राज्यातल्या महाविद्यालयातुन सुमारे ४१५ बी. फार्म, एम. फार्म, विध्यार्थी, प्राध्यापक तसेच पी.एच.डी रिसर्च स्कॉलर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शोध निबंध व पोस्टर प्रेज़ेंटेशन करणार आहेत. स्पर्धकांचे ऑनलाईन व ऑफलाईन विभागणीनुसार मूल्यांकन करण्यात येणार आहे.विजेते आणि उपविजेते यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत.
या परिषदेसाठी मा. कुलगुरू श्री. डी. टी. शिर्के व मा. प्र.कुलगुरु पी. एस. पाटील, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मा.कुलसचिव, प्रो. डॉ. एम. एस. गणचारी, के. एल. ई विद्यापीठ बेळगाव, डॉ. हर्षा हेगडे शास्त्रज्ञ आय सी एम आर, बेळगाव व श्री. रवींद्र पुरोहित संचालक आर. एन. फार्मा कनसल्टिंग पुणे, संभोधित करतील.
ही परिषद संस्थेचे सचिव श्रीमती शोभा तावडे व सहसचिव श्री. सुजय तावडे, यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली व संचालक डॉ. अनिलकुमार कुलकर्णी, प्राचार्य डॉ. राजकुमार बगली, व परिषदेचे सचिव डॉ. आदित्य अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परीश्रमामुळे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.

ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये दाखल,आयर्नविन ख्रिश्चन मैदान येथे शुक्रवारपासून होणार सर्कसला प्रारंभ

0

ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये दाखल,आयर्नविन ख्रिश्चन मैदान येथे शुक्रवारपासून होणार सर्कसला प्रारंभ

कोल्हापूर /प्रतिनिधी : ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. येथील आयर्नविन ख्रिश्चन मैदान ही सर्कस आली असून या सर्कसच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता आणि पाहता येणार आहे.एअर कुलसह तब्बल १५ वर्षानंतर आर्यन ख्रिश्चन हायस्कूल मैदान इथे ही सर्कस दाखल झाली आहे.
शुक्रवार २५ एप्रिल पासून सायंकाळी ६ वाजता या सर्कसचा पहिला शो सादर केला जाणार आहे.तर यानंतर
दररोज दुपारी दीड सायंकाळी साडेचार आणि साडेसात वाजता असे दररोज तीन शो सादर केले जाणार आहेत. करवीरवासीयांनी तब्बल पंधरा वर्षानंतर कोल्हापुरात दाखल झालेल्या बॉम्बे सर्कसचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आर.एम.पिल्लई,पप्पल जी,जितेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरकरांसाठी
शुक्रवार २५ एप्रिल पासून मनोरंजनाचा खजिना घेऊन आली आहे.आर्यन ख्रिश्चन हायस्कूल मैदान इथे दाखल झालेल्या या सर्कसमध्ये आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश आहे. अफ्रिकन, मणिपुर, नेपाली, रशियन, इथोपियन, बंगाली, आसाम आणि आंतरराष्ट्रीय कलाकार चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. कोल्हापूरकरांसाठी उन्हाळा सुट्टी मनोरंजनाची मेजवानी म्हणून ग्रेट बॉम्बे सर्कसचे कलाकार आपल्या चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. ग्रेट बॉम्बे सर्कस जगातील सर्वात जुनी आणि नावाजलेली असून या सर्कसची स्थापना १९२० साली झाली आहे.बॉम्बे सर्कसचे फिर हेराफेरी, धूम, क्रिश, हाथी मेरे साथी, मेरा नाम जोकर, शिकारी, सावधान इंडिया एपिसोड, अमिताभ बच्चनची इन्सानियत, खेल खिलाडी का, तेरी मेहरबानीयाँ अशा विविध चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.सर्कसमध्ये एकूण ४०० कलाकार आणि कर्मचा-यांचा समावेश आहे. ही सर्कस अनेक राज्यात जाऊन आपलं सादरीकरण करून आली आहे.नेपालियन, बंगाली, मणिपूर अशा आंतरराष्ट्रीय कलाकारांचा ७० फुट उंचीवरील हवेतील कॅचींग झोका, इथोपियन कलाकारांचा बांबू डान्स, फुट जगलिंग, एका डोक्यावरती १० टोप्या फिरविण्याच्या कलाकृती, कोडोलिझा, योकेनिन गेम, पोल बॅलन्सींग, ७ फुट उंच असलेला आणि ७० किलो वजन असलेला अफ्रिकन आर्टिस्ट, अवघ्या एक फुटाच्या सायकलवरती कलाकृती दाखवून डोळयाचे पारणे फेडणारा, सायकल बॅलन्सींग एका मोठया कुव्यामध्ये, ७ मोटारसायकलींग बाईकचा समावेश असलेला कारनामा, २० फुट उंचीवर हवेतील जंपींग, जोकरचे पोट धरुन हसविणारे विविध धमाली विनोद, लिंबू डान्स, रशियन मुलींचा ब्रेकडान्स, फायर डान्स, व्हील ऑफ डेथ असे अनेक प्रकारचे आकर्षक खेळ येथे पाहायला मिळणार आहेत.
तरी कोल्हापुरातील रसिक प्रेक्षकांनी या सर्कसचा लाभ घ्यावा असे आवाहन बॉम्बे सर्कसचे
व्यवस्थापक आर.एम.पिल्लई
पप्पल जी,जितेंद्र सिंग यांनी केले आहे.