छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिना दिवशी जो प्रकार घडला हा अशोभनीय- आमदार जयश्री जाधव
कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिना दिवशी जो प्रकार घडला हा अशोभनीय आहे. असा प्रकार मुळीच करवीर नगरीला शोभणारा नाही. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर पोलीस प्रशासनाने वेळीच योग्य कडक कारवाई केली पाहिजे.
संपूर्ण कोल्हापूरवासियांना विनंती करते की, सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घ्यावी, सामाजिक सलोखा राखावा व शांतता राखावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.